Wikipedia

Search results

Wednesday, 29 July 2020

जिल्ह्यात ३१ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत असे तीन दिवस सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार दुकाने!- जिल्हाधिकारी*

*
By Jagdish Thakur (Journalist)  July 29, 2020
आठ दिवसांच्या संचारबंदीचा उद्या अखेरचा दिवस

नंदसत्ता न्युज नेटवर्क
नंदुरबार- जिल्ह्यातील  चार शहरांमधील आठ दिवसांच्या संचारबंदीचा उद्या गुरुवारी शेवटचा दिवस असल्याने सदरच्या संचारबंदीत काही शिथिलता देऊन सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३१ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत असे तीन दिवस सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवहार व दुकाने सुरू ठेवण्यास पूर्वीप्रमाणे परवानगी राहणार आहे. त्यानंतर सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुबा राहील. परंतु त्यासाठी नियमांचे पालन व अटी लागू असतील. नंदुरबार शहादा तळोदा व नवापूर या चार शहरांमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत मागील काळात दिलेल्या आदेशाप्रमाणे मुभा दिलेली दुकाने सुरू राहतील. तर प्रत्येक रविवारी लागू केलेली कडक संचारबंदी कायम असेल. तसेच अक्कलकुवा धडगाव तालुक्यात सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आता नागरिकांनी स्वॅब देण्यासाठी पुढे यावे. यासाठी प्रशासनाकडून दोन मोबाईल स्वॅब पथक नंदुरबार शहरासाठी तयार करण्यात येणार आहे. तालुका निहाय देखील स्वॅब घेण्याचे पथक तयार करण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

No comments:

Post a Comment

*राष्ट्रीय विज्ञान दिन* दरवर्षी 28 फेब्रुवारीला

भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो याचे कारण 28  फेब्रुवारी हा दिवस भारतीयांना अभिमान वाटावा असा आहे डॉ.  सी .व्ही. रामन यांना ...